पोस्ट्स

विठु नामाचा जप करत अवघड रोटि घाट होतो सहज पार..

इमेज
आज सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच उठलो  कारण ही तसेच होते . आज माझ्या पाटस गावात जगदगुरु संत तुकोबारायांच्या पालखीचे आगमन होणार होते . पालखी सोहळा  गावात येणार यामुळे उत्साह वाटत होता . गावात पालखी फक्त दोनच तास ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरात विसावा घेते आणि नंतर रोटी घाटाकडे पालखीचे प्रस्थान होते . जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा समजला जातो . सध्याच्या काळातील वाहनांसाठी हा घाट पार करणे अवघड नाही . परंतु पालखी रथ हा आज ही बैलांच्या साह्याने ओढला जातो . घाटातील चढण , तीव्र वळणे यांमुळे रोटी  घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अवघड टप्पा आहे . हा टप्पा पार करताना मोठी कसरत करावी लागते . रथाला अनेक बैलजोड्या जोडल्या जातात . हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात . पाटस गावातील खुप लोक पालखी सोहळा रोटी घाटाच्या वर पोहचवण्यास येत असतात . तसाच मी ही आलो होतो . दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पालखी घाटाच्या पायथ्याला आली . तेथे पालखी रथास आणखी पाच बैलजोड्या

ग्लोबल वॉर्मिंगचे धोकादायक परिणाम . . . . .

 ग्लोबल वॉर्मिंगचे धोकादायक परिणाम . . . . .   सचिन जगन्नाथ आव्हाड , T.Y.B.VOC (JMC) , ROLL NO: 11507 ग्लोबल वॉर्मिंग फक्त भारत देशासमोरील प्रश्न नाही , तर ही संपुर्ण जगासमोरील समस्या आहे . आजकाल सगळीकडे जागतिक तापमान वाढीबाबत लोक चर्चा करताना  दिसत आहेत . कारण आता सगळ्यांना तापमान वाढीचे परिणाम दिसु लागले आहेत . या शतकातील १७ वर्षे पृथ्वीवरील सर्वांत उष्ण वर्षे होती. या  वर्षांत ०.२०°से ची वाढ सरासरी तापमानात झाली आहे . गेली ६-७ वर्षे पृथ्वीच्या एकंदरीत व स्थानिक सरासरी तापमानात सतत वाढ होत आहे. तापमान वाढीबाबतचे अहवाल स्पष्टपणे म्हणतात की . उत्तर ध्रुवप्रदेशांत दुप्पट वेगाने तापमान वाढ होत आहे. अंटार्क्टिका हा दक्षिण धृवीय क्षेत्रात सरासरी तापमानात वेगाने  वाढ होत आहे. मागील ५० वर्षांत तेथे सरासरी तापमानात जवळपास ३° से ची वाढ झाली. पश्चिम अंटार्क्टिकातील भागातील हिमनद्या सातत्याने मागे हटत आहेत. याचा एकत्रित अर्थ असा आहे की, तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. तातडीने युनोकडून पृथ्वीवर 'पर्यावरणीय आणिबाणी' घोषित व्हायला हवी. तरच जनतेला याचे गांभीर्य समजेल.  असाहि सूर का

आता पोलिसच तुला खाली उतरवतील...

इमेज
चौफुला - बारामती या बसने मोठ्या  संख्येने विद्यार्थी प्रवास करीत असतत .शाळा सुटण्याच्या वेळेत बसला  नेहमीच खुप गर्दी असते . अनेकदा बसमधे उभा रहायला ही जागा मिळत नाही . यामुळे बस बारामती आगारात आली की शाळकरी मुल बसमधे जागा मिळवण्यासाठी खिडकीतून बसमधे चढणे ,शाळेच्या सॅक खिडकीतून सिटवर ठेवुन जागा पकडणे असे प्रकार करीत असतात . चौफुला - बारामती मार्गावरील बसचे काही कंडक्टर आपण खुपच शिस्तप्रिय असल्याचा आव आणत असतात . असाच एक कंडक्टर चौफुला बस जवळील गर्दीत उभा होता . बसमधे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू होती ..एकमेकांना धक्का देत ,दुसर्यांना बाजुला सारुन जो तो प्रवासी बसमधे जागा मिळवण्याचा प्रयत्न करीत होता . हे दृश्य पाहुन आपल्याला बसमधे जागा मिळणार नाही .हे ओळखुन एक शाळकरी विद्यार्थी थेट बसच्या खिडकीतून बसमधे जाऊ लागला . हे पाहताच कंडक्टर महाशयांनी त्या खिडकीकडे ओरडत धाव घेतली परंतु तोपर्यंत तो विद्यार्थी बसमधे जाऊन बसला . तोपर्यंत अनेकजण कंडक्टर महाशय विद्यार्थ्याला कसे खाली उतरवतात हे पाहण्यासाठी त्या खिडकीकडे डोळे लावुन होते . आपण बसजवळ असतानाही विद्यार्थी खिडकीतून कसा काय आत

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला ?

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला असा प्रश्न मला नेहमीच पडत असतो .कारण हजारो शेतकरी बांधव दरवर्षी या ना त्या कारणाने आत्महत्या करत आहेत .हे आत्महत्या करण्याचे सत्र  थांबण्याचे नाव घेत नाही .... धर्मा पाटील यांचा संघर्ष 2009 ते 2014 दरम्यानचा. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता त्या काळात होती. आणि तेव्हा त्यांना न्याय मिळाला नाही. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या विखरण गावातले शेतकरी. 2015 साली औष्णिक वीज प्रकल्पासाठी त्यांची 5 एकर जमिन संपादित करण्यात आली. 5 एकर बागायती शेतीचा मोबदला मिळाला केवळ 4 लाख रुपये.  ही भरपाई इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत फार कमी होती. त्यामुळे वयोवृद्ध धर्मा पाटील यांनी योग्य भारपाईसाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र गेंड्याची कातडी असलेली यंत्रणा जागी होईल तर शपथ. आणि आता भाजपा सरकारच्या काळातही त्यांना न्याय मिळाला नाही .यंत्रणांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं धर्मा पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं. 22 जानेवारीला त्यांनी मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्यांचा मृत्यु झाला . एकंदरीतच काय तर इथल्या  शेतकर्यांस